Realme Narzo 20 blue

Sunday, 11 December 2016

Marathi GK

www.onlymissionmpsc.blogspot.in

०१. बल्लारपूर कागद गिरणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 

०२. नाशिक शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते. 

०३.  २०११ ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची ७ वी जनगणना होती.

०४. २०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार.

०५. २०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर. 

०६. १९२१ या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात.

०७. महाराष्ट्रात भुईमूग पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते.

०८. NH7 राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. 

०९. पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा आंध्र प्रदेश राज्यात आहे.

१०. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी नर्मदा आहे.  

११. हिमरू कला भारतातील कर्नाटक राज्याशी संबंधित आहे.   

१२. गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात येत आहे. 

१३. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान सिक्किम राज्यात आहे. 

१४. टिहरी बांध भागीरथी नदीवर बनलेला आहे. 

१५. गोलकोंडा खाण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात आहे. 

१६. सायलेंट व्हॅली केरळ राज्यात आहे.

१७. जगातील सर्वात लांब कालवा राजस्थान राज्यात आहे. 

१८. शिवसमुद्र धबधबा कावेरी नदीवर आहे. 

१९. माऊंट अबू अरवली पर्वत रांगेत आहे. 


२०. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर आहे.

1 comment:

  1. Nice post thanks for share this. It was launched to give millions of people inspiration. Bing weekly quiz

    ReplyDelete